शाश्वत बांधकाम : अम्मान इंडियाने रस्ते बांधकाम क्षेत्रातील पुनर्वापर तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणले भागधारकांना एकत्र

हैदराबाद, 22जून 2026: रस्ते बांधकाम उपकरणांची आघाडीची उत्पादक कंपनी आणि भारतात 60% पर्यंत प्रगत ॲस्फाल्ट पुनर्वापर उपाय उपलब्ध करून देणारी एकमेव कंपनीअम्मान इंडियानेनोवोटेल हायटेक सिटी, हैदराबाद येथे “रस्ते बांधकामातील पुनर्वापर तंत्रज्ञान” या विषयावर परिसंवाद आयोजित केला.
या परिसंवादात रस्ते बांधकाम, पायाभूत सुविधा, संशोधन आणि धोरणनिर्मिती क्षेत्रातील 35 संस्थांचे 70 हून अधिक प्रतिनिधीसहभागी झाले. पुनर्वापर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साधनसंपत्ती कार्यक्षमता कशी वाढवता येईल, प्रकल्पांचा खर्च कसा कमी करता येईल आणि भारतातील शाश्वत रस्ते विकासाला कशी गती देता येईल हा चर्चेचा केंद्रबिंदू होता.
साहित्याच्या किमती सातत्याने वाढत असताना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शाश्वततेला प्राधान्य दिले जात असतानाया कार्यक्रमाने उद्योगतज्ज्ञांनारिक्लेम्ड ॲस्फाल्टपेव्हमेंट(RAP) आणि इतर पुनर्वापर तंत्रज्ञानाच्या व्यापक स्वीकाराबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या परिसंवादात उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सादरीकरण केले. यातअम्मान इंडियाचे सरव्यवस्थापकश्री. प्रसाद दयाल, ॲस्फाल्ट प्लांट्स, अम्मान इंडियाचे सहाय्यक उपाध्यक्ष आणि उत्पादन प्रमुख श्री. मार्टिन्हो जे. फर्नांडिस, आयआयटी बॉम्बेतील प्राध्यापकडॉ. धर्मवीर सिंह, CSIR-CRRI चे माजी संचालकडॉ. मनोरंजन परिडा, आयआयटी हैदराबादच्या सहाय्यक प्राध्यापकडॉ. रम्या श्री मुल्लापुडी आणिव्हर्टिस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टचे स्वतंत्र संचालकराजेश कुमार पांडे यांचा समावेश होता.सत्रांमध्ये शाश्वत रस्ते बांधकामाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यातॲस्फाल्ट पुनर्वापर तंत्रज्ञान, उच्च RAP वापर, पेव्हमेंट पुनर्वापर पद्धती, रीजुव्हनेटर तंत्रज्ञान, विकसित होत असलेल्या धोरणात्मक चौकटी आणि भारतातील ॲस्फाल्ट पुनर्वापराचे भवितव्ययांचा समावेश होता.
अम्मान इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. धीरज पांडायावेळी बोलताना म्हणाले,“पुढील दशकात भारताच्या रस्ते बांधकाम उद्योगासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आपण किती पायाभूत सुविधा उभारतो हा नसूनकमीत कमीसाधनसंपत्ती वापरून आपण किती मूल्य निर्माण करतो हा असेल.उद्योगाचा स्पर्धात्मक फायदा वाढत्या प्रमाणात नाविन्यपूर्णता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाधिष्ठित साधनसंपत्तीचा वापर यामधून मिळेल. रिक्लेम्ड ॲस्फाल्टपेव्हमेंट(RAP) सारखे उपाय रस्ते मालमत्तांकडे नूतनीकरणक्षम स्त्रोत म्हणून पाहण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल घडवतात. पुनर्वापरासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याकरता उद्योग, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञान पुरवठादार यांच्यातील सहकार्य अत्यावश्यक आहे. अशा चर्चांद्वारे अम्मान भारतात पुनर्वापराला रस्ते बांधकामाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहे.”
RAP च्या वाढत्या क्षमतेवर प्रकाश टाकततज्ज्ञांनीमूळ कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी करताना पेव्हमेंटची गुणवत्ता आणि कार्यक्षमता कायम ठेवता येतेअसे सांगितले. प्रगत RAP तंत्रज्ञानामुळे मूळ स्त्रोतांचा वापर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, इंधनाची बचत होऊ शकते आणि खर्चात बचत होऊ शकतेअशी माहितीही त्यांनी दिली.भारतात पुनर्वापराचे प्रमाण वाढवण्यासाठीतंत्रज्ञानाचा अधिक स्वीकार, धोरणात्मक पाठबळ आणि उद्योग क्षेत्रातील जागरूकता वाढवणेया बाबींवर सहभागींची चर्चा झाली.
परिसंवादात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील पुनर्वापर-आधारित रस्ते बांधकामासाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या संधींचाही उल्लेख करण्यात आला. या राज्यांमध्ये वाहतूक पायाभूत सुविधांवरील सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे.
अम्मान इंडियाचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अंदाजे 50% बाजार हिस्साअसूनकंपनीने या प्रदेशातील अनेक रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. आपला तंत्रज्ञान पोर्टफोलिओ आणि स्थानिक पातळीवरील स्थान यांच्या माध्यमातून कंपनी ठेकेदार आणि प्रकल्प भागधारकांसोबत शाश्वत रस्ते बांधकाम पद्धतींना चालना देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
राष्ट्रीय पातळीवरहीअम्मान इंडिया ॲस्फाल्ट पुनर्वापरातील नाविन्यपूर्णता यांच्या अग्रस्थानीआहे.
परिसंवादाचा समारोप सहभागींच्यासहकार्य अधिक मजबूत करण्याच्या आणि पुनर्वापर तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने वाढवण्याच्या सामूहिक वचनबद्धतेनेझाला. यामुळे भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधा गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्वत बांधकाम पद्धतींची भूमिका अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित झाले.





