हवामान बदल आणि शिक्षण: मुलांचे भविष्य धोक्यात by orf Marathi
सदर लेख orf marathi वर प्रकाशित झाला आहे.
आज आपण ज्या हवामान बदलांचा अनुभव घेत आहोत जसे कि उष्णतेच्या लाटांमुळे शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होत आहे , पूरामुळे शाळांच्या इमारती वाहून जात आहेत, आणि प्रदूषित हवेमुळे शहरांमध्ये श्वास घेणेही कठीण होते आहे, हे सगळं आता केवळ भविष्यातील धोका राहिला नाही तर वर्तमानकाळातील धोके झालेले आहेत आणि हे संकट शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात होताच ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या राज्यांनी शाळेची वेळ लवकर सकाळी करण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांनी उष्णतेपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी लवकर उन्हाळी सुट्टी जाहीर केली, पण केवळ शाळा बंद करणे हा उपाय पुरेसा नाही. हवामान बदलामुळे अनेक प्रकारांनी शिक्षणात अडथळे येतात तसेच उष्णतेमुळे आजारपण आणि गैरहजेरी, पूरामुळे इमारतींचे नुकसान, व प्रदूषणामुळे एकाग्रता कमी होणे. यामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. विशेषतः गरीब आणि दुर्बल वर्गातील मुले सर्वात जास्त त्रास सहन करतात.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे Orf marathi link क्लिक करा