चला, एकत्र येऊया ! समृद्ध वसुंधरेचे रक्षण करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित त्यांनी व्हिडिओतून संवाद साधला आहे.
ते म्हणाले की, पर्यावरण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ‘जागतिक वसुंधरा दिनापासून’ म्हणजेच 22 एप्रिल पासून 1 मे या कालावधीत विशेष अभियान राबवत आहे. स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाण्याचा पुनर्वापर, हरित ऊर्जा आणि ‘रिड्यूस-रियूज-रिसायकल’ यांचा अंगीकार करून आपण या उपक्रमात सहभागी होऊया. चला, निसर्गासाठी एक पाऊल पुढे टाकूया!